Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 3 आजी : कुटुंबाचं आगळ

We have Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 3 (आजी : कुटुंबाचं आगळ) that will help you solve the exercise and understand the concepts.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 3 आजी : कुटुंबाचं आगळ

प्रश्न 1) पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा.

Advertisements

बैठे खेळ

  • चिंचोके
  • गजगे
  • खापराच्या भिंगर्‍या
  • जिबल्या
  • मुगळा

मैदानी खेळ

  • विटीदांडू
  • भोवरे
  • कुरीचा डाव
  • गोटया
  • सुरपारंब्या

प्रश्न 2) खालील मुद्‌द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.

उत्तर:

आजीचे दिसणे: आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.

आजीचे राहणीमान: त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.

आजीची शिस्त: आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.

प्रश्न 3) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.

उत्तर:

‘अ’ गटउत्तर
(१) आळसउत्साह
(२) आदरअनादर
(३) आस्थाअनास्था
(४) आपुलकीदुरावा

प्रश्न 4) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा.

(अ) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

उत्तर – सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

(आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

उत्तर – दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

(इ) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

उत्तर – कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.


प्रश्न 5) कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

(खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्‌विगुणित, आमची)

(अ) समुद्रकिनारी ……………. सहल गेली होती.

उत्तर – समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.

(आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ………………. झाला.

उत्तर – खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्‌विगुणित झाला.

(इ) विजय अजयपेक्षा ………………… चपळ आहे.

उत्तर – विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे.

(ई) रवीला ………………………. कैऱ्या खायला खूप आवडतात.

उत्तर – रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात.

(उ) मला गाणी ऐकण्याची …………………… आवड आहे.

उत्तर – मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.

(ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ………………… पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

उत्तर – राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

प्रश्न 6) खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थलिहून चौकटी पूर्ण करा.

उत्तर:

प्रश्न 7) स्वमत.

(अ) ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

उत्तर: आगळ’ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची.

वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्र सारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.

(आ) तुलना करा/साम्य लिहा.

  • आगळ-वाड्याचे कवच
  • आजी-कुटुंबाचे संरक्षक कवच

उत्तर: आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते.

प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते.

(इ) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर: या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती, कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे.

या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात; याचा कुटुंबालाच फायदा होतो, हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वतंत्र राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.

(ई) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर: ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते.

पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई, कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाय असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून ‘आजी : कुटुंबाचं आगळ’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

उपक्रम

(१) तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा.

१) गावाकडच्या कुस्त्या – आमच्या गावाला कुस्त्यांचे वेड होते. बाळू पहिलवान प्रसिद्ध होता. नंतर पांडुरंग पाटलांनी नाव कमावले. पाटील मंडळी स्वभावाने चांगली व आर्थिकदृष्ट्या सुस्थिर होती. ते शाळकरी पोरांना रानात गोळा करत. कुस्त्या लावत. जगन्नाथ कृष्णा यादव ताकदीवर राहुलला उताणा करी. प्रल्हादराव पाटील, अच्युतराव पाटील ही उत्साही मुले सर्व खेळात आघाडीला असत. मध्येच कोणी ढोल आणत, लेझीम आणत. मग जुनी जाणती माणसेही यात सहभागी व्हायची.

२) गोट्यांच्या खेळाचे प्रकार – गोट्यांच्या खेळाचे रिंगण डाव, अकरा टोकरा व कुरघोडी असे तीन प्रकार आहेत. रिंगण डावात तीन-तीनचे दोन गट पाडत . ज्यांच्यावर डाव येईल, त्यांच्या गोट्या रिंगणात मांडल्या जात दोन डावांत या गोट्या रिंगणाबाहेर काढायच्या तिसऱ्या डावाला राण्या वाटून घेतल्या जात. वाट्याला आलेली गोटी पिंगवत दूरवर न्यायची. ज्याची गोटी असेल त्याने कान पकडून ढोपराने खुरटायचे. अकरा-टोकरा डावात मुठीने खुरटावे लागायचे.

३) कुरघोडीचा डाव – कुरघोडी या डावात दोन खेळाडूंचा एक गट, दोघांनी खेळायचे. दोघांनी एकमेकांनी घोडा करून पाठीवर बसायचे. खेळणारा जोडीदार चांगला असला तर बरे, नाही तर दिवसभर घोडीसारखे पाठीवर ओझे घेऊन वाकावे लागते. म्हणून हा डाव टाळण्याकडे पोरांचा कल असे.

४) चोर-शिपाई – या खेळात काहींनी चोर व्हायचे काहींनी शिपाई व्हायचे. दिवस मावळायच्या आधी तासभर हा खेळ सुरू व्हायचा. मारुतीच्या दिवळात वरच्या अंगाला पत्र्याची पाने उरावर घेऊन पोर लपून बसायची. पोलीस झालेली पोरे त्यांना शोधत. कोणी बॅटरीवाला आला की त्याला घेऊन चोर झालेल्यांना शोधून काढले जात. हा शिवाशिवीचाच डाव असायचा. गाणे म्हणून पोंर निवडली जायची.

Leave a Comment