Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

By Admin

Updated on:

Advertisement

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 11 Questions and Answers

We have provided Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 11 (गोष्ट अरुणिमाची) that will help you solve the exercise and understand the concepts. below you will find all the questions and answers for Chapter 11.

Class 10 Marathi Kumarbharati Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

प्रश्न 1) आकृती पूर्ण करा.

उत्तर: अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती :

  1. फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.
  2. खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न 2) खालील कृतींतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.

उत्तर:

  • अ) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला – वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर
  • आ) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला – चपळता
  • इ) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती – ध्येयवादी
  • ई) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला – व्यवहारी

प्रश्न 3) कोण ते लिहा.

उत्तर:

  • अ) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला – बचेंद्री पाल
  • आ) सर्वांत मोठा मोटिव्हेटर – स्वतःच
  • इ) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे – भाईसाब
  • ई) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन – अरुणिमा

प्रश्न 4) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

उत्तर:

  1. ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.
  2. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
  3. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.
  4. आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.
  5. मी अशी नि तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.

प्रश्न 5) अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवांबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.

(अ) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.

उत्तर: समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.

(आ) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.

उत्तर: अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.

प्रश्न 6) पाठातून तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

उत्तर:

  1. पराकोटीचे धैर्य
  2. अमाप सहनशक्ती असणारी
  3. जबरदस्त आत्मविश्वास असलेली
  4. अन्यायाविरुद्ध लढणारी
  5. ध्येयवादी
  6. जिद्दी.

प्रश्न 7) पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा.

उत्तर:

  • नॅशनल – राष्ट्रीय
  • स्पॉन्सरशिप – प्रायोजकत्व
  • डेस्टिनी – नियती
  • कॅम्प – छावणी
  • डिस्चार्ज – मोकळीक, पाठवणी
  • हॉस्पिटल – रुग्णालय

प्रश्न 8) पाठात आलेल्या खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा.

  1. Now or never!
  2. Fortune favours the braves

उत्तर:

  1. आता नाही तर कधीच नाही !
  2. शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते.

प्रश्न 9) ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.

उत्तर:

  • धोकादायक पर्वत चढणे.
  • मृत्यू येईल असे वाटायला लावणाऱ्या कृती करणे,
  • ध्येयापासून दूर लोटू पाहणारे प्रशिक्षणातील कष्ट.
  • पाय रोवायचा प्रयत्न केला की टाच व चवडा गोल फिरायचा, म्हणून पाय घट्ट रोवणे कठीण व्हायचे.

प्रश्न 10) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा.

उत्तर:

  1. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच, असे नाही.
  2. सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
  3. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहू नका.
  4. प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.

प्रश्न 11) खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा.

(अ) सायरा आज खूप खूश होती.

(आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

(इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.

(ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.

उत्तर:

  1. होती
  2. टाकला
  3. आवडले
  4. सुचली.

प्रश्न 12) खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

शब्दमूळ शब्दलिंगवचनसामान्य रूपविभक्ती प्रत्ययविभक्ती
(१) कागदपत्रांचेकागदपत्रनपुंसक लिंगअनेक वचनकागद पत्रांचेषष्ठी
(२) गळ्यातगळापुल्लिंगएकवचनगळ्यासप्तमी
(३) प्रसारमाध्यमांनीप्रसारमाध्यमेनपुंसक लिंगअनेक वचनप्रसार माध्यमेनीतृतीया
(४) गिर्यारोहणानेगिर्यारोहणनपुंसक लिंगएकवचनगिर्यारोहणनेतृतीया

प्रश्न 13) स्वमत.

(अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते, हा अरुणिमाचा संदेश आहे. याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एडिसन चे उदाहरण उत्तम ठरेल. या एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्याला आपण बल्ब म्हणतो. या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने हजारापेक्षा जास्त प्रयोग केले. शेवटी तो यशस्वी झाला. म्हणजे यशस्वी प्रयोगाच्या आधीचे त्याचे हजारापेक्षाही जास्त प्रयोग फसले, वाया गेले, असे म्हटले पाहिजे. पण हे असे म्हणणे चूक आहे. कारण आपण निष्फळ समजतो, त्या प्रयोगांमधून एडिसनला एक भक्कम ज्ञान मिळाले होते. त्या निष्फळ प्रयत्नांच्या पद्धतींनी बल्ब निश्चितपणे तयार करता येत नाही, हे ते ज्ञान होते. हे नीट समजून घेतले, तर भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करता येते आणि यश निश्चितपणे मिळवता येते. म्हणून अपयशाने खचून जाता कामा नये. अपयशाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अपयश हे भावी यशाचा पाया असते.

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये अपयश मिळाले की अनेकजण खचून जातात. हे योग्य नाही. निकालानंतर शांत चित्ताने बसून आपल्या परीक्षेतील अपयशाचे विश्लेषण केले पाहिजे. आपल्या कोणत्या चुका झाल्या, अभ्यासातला कोणता भाग आपल्याला कळला नाही, तो आपण नीट समजावून घेतला होता का, समजावून घेताना कोणत्या अडचणी आल्या या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. हे आपण प्रामाणिकपणे केले, तर भविष्यात आपण कधीही नापास होणार नाही.

(आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर: कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते. एखादयाला नृत्य आवडते. एखाद्या खायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वत:चे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे.

(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.

उत्तर: आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो, त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो, हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वांत जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वांत जास्त उंच, सर्वांत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अपठित गद्य आकलन

(अ) उतारा वाचून दिलेल्या कृती करा.

(1) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.

(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ______

(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. _______

उत्तर:

(अ) वृक्ष बहरू लागले आहेत – वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे.

(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे – करंगळीची सोंड झाली आहे. 

(2) स्पष्ट करा.

(अ) पाणी समजूतदार वाटते _______

(आ) पाणी क्रूर वाटते _______

उत्तर:

(अ) पाणी समजूतदार वाटते, पाणी शांतपणे वाहते, तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजीच घेत असावे असा भास होतो. म्हणून ते त्या वेळी समजूतदार वाटते.

(आ) पाणी क्रूर वाटते, नदकाठावरच्या गरिबांच्या झोपडया उद्धवस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब, दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी, अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे, असे वाटू लागते.

(आ) खालील आकृत्या पूर्ण करा.

उत्तर:

वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप :

  • आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते.
  • संपूर्ण अवकाश पाणावलेला असतो.
  • अधूनमधून पाऊस कोसळत असतो.
  • सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते.
  • नदी नाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते.
  • नवे पाणी उसळत, घुसळत व फेसाळत वाहते.

उत्तर:

पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया :

  • उसळत, घुसळत, फेसाळत धावणे.
  • काठ ओलांडून ओसंडून वाहणे.
  • संथपणे, धीरगंभीरपणे वाहणे.
  • बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे.

(इ) तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अधोरेखित अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.

उत्तर:

वाक्यअव्ययअव्ययाचा प्रकार
(1) पाणी कुठे गच्चीवर लोळते.कुठे, वरक्रियाविशेषण व, शब्दयोगी अव्यये
(2) पाणी येते आणि जाते.आणिउभयान्वयी अव्यय

Q. उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते. जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. त्यामुळे नदीनाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते. वाहताना ते कधी काठाला धडकते, तर कधी काठावर चढते. यावरून पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो. काही काही ठिकाणी ते इतके संथपणे वाहते कि वाटावे जणू काही ते आपला दरारा दाखवत आहे. मोठ्या पुलांखालून पाणी वाहत जाते, तेव्हा ते समजूतदार, शहाण्या मुलासारखे वाटते. कधी कधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपडया उध्वस्त करते. अशा वेळी ते स्वभावाने खूप क्रूर असावे, असे मनात येते. कधी कधी ते झाडावर चढते, गच्चीवर लोळते, घाटाला बुडवते, वाटेला तुडवत. अशा वेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो. असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उताऱ्यातून जाणवत राहतात.

Q. वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.

उत्तर: आपल्याकडे अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळतो. पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. पावसाचे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्याचे व साठवून ठेवण्याचे काही उपाय आहेत. ते आपण अमलात आणले पाहिजेत. खूप महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चार खोदणे. त्या चरांमध्येच वाढणारी झाडे लावावीत. पाणी थबकत थबकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीत भरपूर मूरते. पाझर तलाव खोदल्यावरसुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडे लावल्यास झाडांची मुले जमिनीत पाणी धरून ठेवतात. अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. विहिरींमध्ये वर्षभर पाणी राहते. पाणी साठवण्यासाठी जमिनीत खड्डेसुद्धा खोदतात. या खड्ड्यांतील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडझाडोऱ्याला व गुरांना पाणी देता येते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवत येते.

Advertisement

Leave a Comment