Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 Questions and Answers
Here in this article, you will find Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल. these solutions will help you solve the exercise and understand the concepts.
Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 शाल
प्रश्न 1) उत्तरे लिहा.

उत्तरे:
- (अ) पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख – पुलकित शाल
- (आ) २००४च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष – लेखक रा. ग. जाधव
- (इ) पाठात उल्लेख असणारी नदी – कृष्णा
- (ई) सभा संमेलने गाजवणारे कवी – नारायण सुर्वे
प्रश्न 2) शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा.

उत्तर:
शालीचे उपयोग
- सन्मान करण्यासाठी
- शोभा वाढवण्यासाठी
- लहान मुलाला ऊब देण्यासाठी
- भिक्षेकऱ्याला पांघरण्यासाठी
- शाल विकून अन्नाची ऊब मिळवण्यासाठी
प्रश्न 3) खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.
(अ) एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
उत्तर: लेखकाने हे दृश्य पाहून न राहावून स्वत:च्या सुटकेसमधील पु. लं. नी दिलेली शाल व त्यासोबत काही पैसे खिडकीतून त्या बाईला देऊ केले.
(आ) म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.
उत्तर: लेखकाने दुसऱ्याच दिवशी त्या भिक्षेकऱ्यास दोन शाली दिल्या.
प्रश्न 4) कारणे शोधून लिहा.
(अ) एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण _____.
उत्तर: बॅगेत फक्त पडून राहिलेल्या शालीचा उपयोग थंडीने कुडकुडणाऱ्या एका गरजूला थंडीपासून वाचवण्यासाठी झाला होता.
(आ) शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण _____.
उत्तर: नारायण सुर्वे हे मुळातच शालीन होते.
(इ) लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण ____.
उत्तर: शाल हे सन्मानाचे प्रतीक आहे व सन्मान केल्यानंतर अनेक वेळा तो सन्मान मिळवणारी व्यक्ती अहंकारी बनते.
प्रश्न 5) आकृती पूर्ण करा.

उत्तर:
- विश्वकोशाचा अध्यक्ष
- मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष
प्रश्न 6) खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

उत्तर:
- (अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. – औदार्य, संवेदनशील मन, माणुसकी
- (आ) खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते! – मनाचा सच्चेपणा, प्रगल्भता
- (इ) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. – मनाचा मोठेपणा, दानशूरता
प्रश्न 7) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
(अ) जवळपास (आ) उलटतपासणी
उत्तर:
- (अ) जवळपास- जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ.
- (आ) उलटतपासणी- उलट, तपासणी, पास, पाणी, पाट, पाल, पालट, पात.
प्रश्न 8) अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा.

उत्तर:
- (अ) नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे.
- (आ) खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या.
- (इ) मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले.
प्रश्न 9) ‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर: लेखकाने सुटकेमधील काढलेली शाल कशी होती?
प्रश्न 10) शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’,‘अवाळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.

उत्तर:
– ता | – त्व | – आळू | – पणा |
भव्यता | ममत्व | दयाळू | शहाणपणा |
दीनता | लघुत्व | कष्टाळू | मोठेपणा |
स्वच्छता | दातृत्व | झोपाळू | चांगुलपणा |
मित्रता | कर्तव्य | पायाळू | खरेपणा |
सहनशीलता | प्रभुत्त्व | कनवाळू | साधेपणा |
प्रश्न 11) अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(अ) लेखक सुंदर लेखन करतात.
उत्तर: लेखिका सुंदर लेखन करते.
(आ) तो मुलगा गरिबांना मदत करतो.
उत्तर: ती मुलगी गरिबांना मदत करते.
प्रश्न 12) स्वमत.
(अ) ‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: शालीनता हा एक स्वभावगुण आहे, जो मुळातच व्यक्तीमध्ये असावा लागतो, तर शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीचा गौरव करण्याकरता श्रीफळ व शाल दिली जाते; मात्र या सन्मानाच्या रूपाने व्यक्तीला मिळालेली शाल व शालीनता यांचा संबंध असेलच असे नाही. कवी नारायण सुर्वेही हीच बाब सांगतात. शाल मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन असेल किंवा शाल न मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन नसेल असे होत नाही. शाल पांघरून मनाची, आचरणातील शालीनता मिळवता येत नाही. त्याचप्रमाणे मुळातच शालीन असणारी व्यक्ती शाल रूपाने सन्मान मिळवतेच असेही नाही; मात्र ती व्यक्ती आपल्यातील शालीनता जपून ठेवते. त्यामुळे, ‘शाल आणि शालीनता’ यांचा विशेष संबंध असेलच असे नाही.
(आ) ‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर: माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. ही गरज भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याला उपयुक्त ठरणार होत्या; मात्र शरीराच्या उबेची गरज ही त्याच्याकरता दुय्यम होती. पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या भिक्षेकऱ्याला पोटभर अन्नाची अधिक गरज वाटली. त्यामुळे, मागचा-पुढचा विचार न करता त्याने त्या शाली विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने आपली प्राथमिक गरज भागवली. त्याला जाणवणारी भूक ही त्याला बोचणाऱ्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती. त्यामुळे, त्याने घेतलेला हा निर्णय योग्यच होता असे मला वाटते.
(इ) लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: मी इयत्ता सहावीत असतानाची गोष्ट. वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो, म्हणून आजी-आजोबांनी मला सायकल घेऊन दिली. मला खूपच आनंद झाला होता. आठ दिवसांतच मी सायकल चालवायला शिकलो आणि तेव्हापासून ती माझी सोबतीच झाली. शाळेत, मैदानावर कुठेही जाताना मी माझ्या सायकलशिवाय जाऊच शकत नाही, इतकं माझं तिच्याशी घट्ट नातं जुळलं आहे. आजी आजोबांचे प्रेम, मित्रांसोबत सायकलवरून केलेल्या सहली, धम्मालमस्ती अशा अनेक आठवणी या सायकलशी जोडल्या गेल्या आहेत, म्हणूनच मी जिव्हाळ्याने तिची काळजी घेतो, देखभालही करतो. अशी ही सायकल माझ्यासाठी फक्त एक वस्तू नाही, तर हक्काची, जीवाभावाची व्यक्तीच झाली आहे.